Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

मुंबई : वाढीव वीज बिलामुळे राज्य सरकार विरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाली असतानाच राज्य सरकारने राज्यातील शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे.कृषीपंपाच्या थकीत वीज बिलात ५० टक्के सवलत दिली जाणार असून पाच वर्षातील थकबाकीदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल,अशी माहिती राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण जाहीर करण्यात आले आहे.

नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले आहे.त्यामध्ये लघुदाब वाहिनी,उच्चदाब वाहिनी,सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.तसेच राज्यातील शेतक-यांना मोठा दिलासा राज्य सरकारने दिला असून, कृषीपंपाच्या थकीत वीज बिलात ५० टक्के सवलत दिली जाणार असून पाच वर्षातील थकबाकीदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल,असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.राज्यातील शेतकऱ्यांकडे कृषी पंपांची ४० हजार कोटींची थकीत रक्कम आहे, दरवर्षी एक लाख शेतकऱ्यांचे नवीन वीज जोडणीसाठी अर्ज येत असतात. फडणवीस सरकारच्या २०१८ च्या वीज धोरणामुळे कृषी पंपांना नवी जोडणी देण्यात अडचणी होती, असे तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *