Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी.ती म्हणजे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा 13 ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यामुळे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.विशेषता: किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सदर कालावधीमध्ये आपल्या पातळीवरून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना तात्काळ देण्यात याव्यात,जेणेकरून मनुष्य हानी टाळता येणे शक्य होईल,अशी सूचना सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *