Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापूर, दि. 25: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नादुरूस्त बंधाऱ्यांना दुरूस्त करण्यासाठी राज्य शासनाकडून 13.10 कोटींचा निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीमध्ये झालेल्या चर्चेनुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधारे दुरूस्तीबाबत बैठक घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज पुणे येथील विधानभवन येथे श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यातील नादुरूस्त बंधाऱ्याबाबत बैठक झाली. यावेळी पालकमंत्री श्री. भरणे, आमदार शहाजीबापू पाटील, प्रशांत परिचारक, माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, जलसंपदाचे कार्यकारी संचालक टी.एन. मुंडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे उपस्थित होते.

बंधारे दुरूस्तीसाठी 13.10 कोटींचा प्रस्ताव पालकमंत्री श्री. भरणे यांनी सादर केला. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी प्रस्तावाला तत्वता मान्यता दिली आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी देऊन नादुरूस्त बंधारे दुरूस्त करण्याचे आदेश दिले.

श्री. भरणे यांनी नादुरूस्त बंधारे पावसाळ्यापूर्वी दुरूस्त न झाल्यास सर्व पाणी वाहून जाईल. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी राहणार नाही, असे श्री. पवार यांच्या निदर्शनाला आणून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *