Big9 News
धाराशिव
सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे या तुळजापूरला आई कुलस्वामिनीच्या दर्शनाला आल्या होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या की, मला ‘स्वराज्य रक्षक संभाजीराजे’ या ऐतिहासिक मालिकेत काम करण्याचे सौभाग्य लाभले, या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलीची म्हणजे राणूअक्का यांची भूमिका साकारता आली
. कुलस्वामिनी तुळजाभवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराज यांची ऊर्जादायी असल्याने इथे येऊन मी मनोभावे दर्शन घेतले ज्यांच्या दर्शनामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते. या वेळी त्यांच्यासोबत ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ चे कार्याध्यक्ष निलेश जगदाळे, पत्रकार अनिल आगलावे, सचिन ताकमोघे, गोविंद खुरुद, ज्ञानेश्वर गवळी, शुभम कदम, सज्जना दूटाळ, रुचिका खामकर, ज्ञानेश्वर काळे, प्रशांत कांबळे, श्रीकांत देशमुख, राहुल गव्हाणे, विशाल केदार, गणेश तानवडे, आकाश लांडगे, रोहीत लोमटे आदी उपस्थित होते.
त्यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या त्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहेत. या आधी त्या झी मराठीवरून प्रसारित होणाऱ्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत राणूअक्का या भूमिकेत दिसल्या होत्या. या मालिकेमुळे अश्विनी महांगडे या घराघरात राणूअक्का म्हणून लोकप्रिय झाल्या होत्या. याशिवाय त्यांनी ‘टपाल’ आणि ‘बॉईज’ या चित्रपटांमध्येही काम केले होते.
अश्विनी या अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपताना सुध्दा दिसतात. त्याची प्रचिती ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ आणि ‘फ्लाईंग एंजल’ या त्यांच्या संस्थेतून दिसते. ‘आपले मत, आपले विचार हे परखडपणे मांडलेच पाहिजेत’ या धोरणावर त्या चालतात.
विशेष म्हणजे धाराशिव मध्ये प्रतिष्ठानची ओळख ज्यांच्यामुळे निर्माण झाली असे प्रतिष्ठानचे एक सदस्य राम जळकोटे, ज्यांच्या मुळे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान च्या पुढे धाराशिव हे नाव लागल. कायम व्यस्त असून पण प्रतिष्ठानसाठी ‘वेळात वेळ काढून वेळ देणारे’ राम जळकोटे यांची आजी महादेवी महादेवप्पा नरे (वय ७२ वर्षे), रा.अणदूर यांचे त्याच दिवशी दि.५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाल्याने ते येऊ शकले नाहीत. सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेवप्पा नरे यांच्या पत्नी आणि प्रा. संतोष नरे यांच्या त्या मातोश्री होत्या. खरेतर कामाशी एकनिष्ठ असणाऱ्या राम जळकोटे यांना स्वतःची प्रसिद्धी फारशी आवडत नाही. कोणत्याच गोष्टीचा बडेजाव तर त्यांनी कधीच मिरवला नाही. जळकोटे यांच्याकडे ‘माणसं असो वा नाती’ ते जपण्याची एक विलक्षण हातोटी आहे, जे की सर्वांना जमत नाही. त्यांच्या या विलक्षण हातोटीचे – कामाचे अश्विनी महांगडे, निलेश जगदाळे यांनी सुध्दा बऱ्याच वेळा कौतुक केलं आहे. शेवटी बोलताना निलेश जगदाळे म्हणाले की, या साठी ज्यांनी विशेष सहकार्य केले ज्यांनी राम जळकोटे यांची उणीव वा कमी भासू दिली नाही. असे पत्रकार अनिल आगलावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सुद्धा आभार मानावे तितके कमीच आहेत.
महिलांनी आपल्यावर होणारे अन्याय – अत्याचार या वर व्यक्त होणे आवश्यक आहे. मला असं वाटतं कि ज्या महिला व्यक्त व्हायला घाबरतात त्यांनी व्यक्त व्हावं. तेव्हा माझी आई भवानी चरणी हिच प्रार्थना आहे की, त्यांना व्यक्त होण्यासाठी आई सकारात्मक ऊर्जा देवो जेणेकरून आपल्यावर झालेले अन्याय ते सांगतील त्याच्या विरोधात उभ्या राहतील. आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यावर महांगडे म्हणाल्या की, आई च्या दर्शनामुळे जगण्याची एक वेगळीच ऊर्जा मिळते जी मी असं सांगु शकत नाही. ज्यांनी ज्यांनी निष्ठेने मनोभावे दर्शन घेतले असेल त्यांनी ती ऊर्जा नक्कीच अनुभवली असेल.
– अश्विनी महांगडे यांनी व्यक्त केलं