Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे धाराशिव ,तुळजापूर दौऱ्यावर येऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली तसेच तुळजाभवानीचे दर्शन घेतले दरम्यान सोलापुरातल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली

परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे कष्ट त्यांनी घेतले नाहीत, अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल असून तसेच फळबागांचे देखील नुकसान झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करण्याऐवजी ते तात्काळ मुंबईला नेऊन गेले हे सरकार शेतकरी विरोधी असून मुख्यमंत्र्यांचा धाराशिव दौरा म्हणजे मार्केटिंग आहे अशी टीका प्रदेश काँग्रेस चे प्रवक्ता प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *