Big9 News
सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन
सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हुक़ूमशाही मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे स्टेशन जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी रिबीन बांधून मूक सत्याग्रह आंदोलन केले.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, भारत जोडोच्या माध्यमांतुन राहुल गांधी जनतेचे प्रश्न सतत मांडत आहेत. त्यांची वाढणारी लोकप्रियता आणि मोदी- अदानी भ्रष्टाचार प्रकरणावरुन संसदेत आणि संसदेबाहेर सातत्याने आवाज उचलत आहेत. आजपर्यंत अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल, महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले त्यांच्याविरुद्ध आजपर्यंत काहीच कारवाई झाली नाही. पण देशातील लोकांचा पैसा बुडवून पळून गेलेल्या अनेक उद्योगपती मोदींच्या नावावरुन राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून शिक्षा केली. आणि लगेच त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना घर ख़ाली करण्याची नोटिस देण्यात आली. असे करून राहुल गांधी आणि विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याविरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी तोंडाला काळी पट्टी लावून मुक सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी सत्य परिस्थिती सांगितली महागाई, बेरोजगारी विरुद्ध आवाज उचलले एक सामान्य माणसाने, विरोधकांनी जे केले पाहिजे तेच राहुल गांधी यांनी केले. त्यामुळे मोदींना असुरक्षितता वाटत आहे. त्यांचा अहंकार दुखावला गेला. मोदी सरकार घाबरून गेले आहेत. विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याला एवढा त्रास देत आहेत तर सामान्य माणसाची गत काय? राहुल वरील कारवाईमुळे जगात चुकीचा संदेश जात आहे. मोदी- अदानी प्रकरणावरुन लक्ष हटविण्यासाठी, JPC चौकशीवरुन लक्ष हटविण्यासाठी राहुलजी गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली. पण राहुल गांधी यांनी डरो मत चा संदेश दिला असून देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोदी सरकारच्या हुक़ूमशाही विरुद्ध लढा चालू ठेवतील.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, प्रदेश चिटणीस अँड मनीष गडदे, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, माजी महापौर सुशीला आबूटे, आरिफ शेख, मा. नगरसेवक तौफीक हत्तूरे, शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, मा. नगरसेविका वैष्णवी करगुळे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, भीमाशंकर टेकाळे, बसवराज म्हेत्रे, विश्वनाथ साबळे, अश्विनी जाधव, राजन कामत, हाजी मैनुद्दीन शेख, NK क्षीरसागर, अँड केशव इंगळे, वाहिद बिजापुरे, अनिल पल्ली, तिरुपती परकीपंडला, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, अनिल मस्के, महेश जोकारे, युवराज जाधव, कुणाल गायकवाड़, संजय गायकवाड, शकील मौलवी, रवि आंबेवाले, प्रतीक आबूटे, लखन गायकवाड़, जितु वाडेकर, राहुल वर्धा, राहुल गोयल, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, शकील शेख, रूपेश गायकवाड़, VD गायकवाड, चक्रपाणी गज्जम, दीनानाथ शेळके, शिवशंकर अंजनालकर, हाजिमलंग नदाफ, राजेन्द्र शिरकुल, सलीम मनुरे, सुभाष वाघमारे, नागनाथ शावने, कमरुनिस्सा बागवान, अंजली मंगोडेकर, सुनील सारंगी, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, वसिष्ठ सोनकांबले, श्रुतिका तुप्पद, अप्पा सलगर, श्रद्धा हुल्लेनवरु आबूटे, विवेक इंगळे, अरुणा वर्मा, शिल्पा चांदने, संध्या काळे, शाहु सलगर, धीरज खंदारे, सत्यनारायण संगा, महेंद्र शिंदे, राजाभाऊ महाडिक, मनोहर माचरला, श्रीशैल रणदिवे, रुकैया बिराजदार, अनिता भालेराव, नागनाथ शावने, ज्ञानेश्वर जाधव, मुमताज तांबोली, बसंती सालुंखे, प्राजक्ता घाटे, लता सोनकांबले, शुभांगी लिंगराज, अशोक सायबोलू, श्रीकांत दासरी, मनोहर सालुंखे, अजिंक्य पाटील, दीपक फुले, मनोहर चकोलेकर, श्रीशैल रनखांबे, सुनीता बेरा यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.