Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

कोरोनाची भीती नको काळजी घ्या.. सतर्क रहा

सद्यस्थितीत पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत आहे असे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मे महिन्यात कोरोनाचा उद्रेक वाढेल असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

 

आज मुंबईत  दिवसभरात 182 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात 220 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात सध्या 1 हजार 663 ऍक्टिव्ह कोरोना बाधित असल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात  दिवसभरात 650 नव्या कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 779 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 5 हजार 916 ऍक्टिव्ह कोरोना बाधित राज्यात गेल्या 24 तासात तीन कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद.

काही ठिकाणी कोरोना बाधित वाढू नये म्हणून मास्कचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारी कर्मचारी व निमसरकारी कार्यालय, कॉलेज
बँकामधे कर्मचारी अधिकाऱ्यांना मास्कसक्ती करण्यात आली आहें.

दरम्यान मे महिन्यात उद्रेक होईल असा इशारा नागपूरच्या आय आईटी शास्त्रद्याने दिली आहें. मे महिन्यात दररोज 20हजार कोरोनाबाधीत आढळतील शास्त्रज्ञाच्या या इशारामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *