Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

बीड तालुक्यातील बाळापूर येथे घरासमोरच्या विद्युत तारेचा शॉक लागून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री बाराच्या दरम्यान ही घटना घडली. बाबासाहेब सुरवसे, सुरेश सुरवसे, आणि अशोक सुरवसे या मृत व्यक्तींची नावे आहेत.

बीडमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे विजेच्या खांबावरची तार तुटून पडली होती. यावेळी मध्यरात्री सुरवसे कुटुंबियांचे कपडे वाळत घालण्याच्या वायर पर्यंत करंट पास झाला. यावेळी आपल्या मुलाला शॉक लागल्याचे पाहून वडील आणि भाऊ त्याला सोडवण्यासाठी गेले. दुर्दैवाने या दोघांनाही शॉक लागून मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *