Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

आज संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुणे विभागामध्ये सर्वात जास्त नुकसान हे सोलापूर जिल्ह्यातील शेतीचे झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीची घोषणा करणे आवश्यक होते, पण त्यांनी तसे केले नाही त्यामुळे अजित पवार हे नामधारी उपमुख्यमंत्री आहेत अशी टीका माजी पालकमंत्री आमदार देशमुख यांनी केली.

अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील 58 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे ,तर जिल्ह्यातील 623 गावे जलमय झाली आहेत. या गावातील 8 हजार 608 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे एकूण 32 हजार 521 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना तसेच धार्मिक मठांमध्ये ठेवण्यात आले आहे या लोकांना शासनाकडून म्हणावी तशी मदत मिळत नसल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. या अतिवृष्टीत सोळा जण मृत्युमुखी पडले आहेत .

आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला.या दौऱ्या वेळी बळीराजा पवार यांच्या दौऱ्याकडे आस लावून बसला होता. अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री आज काही तरी मोठी घोषणा करतील आणि आपल्या पदरी काहीतरी भरघोस मदत मिळेल परंतु कशाचे काय या सरकारमधील सर्व मंत्र्यांना महाराष्ट्रातील जनतेचे देणेघेणे नाही. तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत त्या अजित पवारांनी आज सोलापूर दौऱ्यावेळी मोठी आर्थिक पॅकेजची घोषणा करणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही यावरूनच या तिघाआघाडी सरकारमधील अजित पवार हे नामधारी उपमुख्यमंत्री असल्याचे सिद्ध होते. अशी प्रतिक्रिया शहर उत्तर चे आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर असल्याने आणि उद्धव ठाकरे हे प्रमुख असल्याने आपण मदतीची घोषणा करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया शनिवारी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *