Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

पुणे-बंगलोर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. गोव्याला फिरायला जात असताना काळानं घाला घातला आहे. उंब्रज जवळील तारळी नदीजवळ हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला आहे.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्सनं गोव्याला जात असताना उंब्रज नदीजवळ ही गाडी अचानक कठडा सोडून 40 फूट खोल कोसळली. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सात जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या ठिकाणी अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आणि स्थानिकांकडून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी साताऱ्यात वाशीवरून गोव्याला जाणाऱ्या 6 जणांवर काळाचा घाला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज गावच्या तारळी पुलाचा कठडा तोडून 40 फूट ट्रॅव्हलर बस पडून झालेल्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांमध्ये एक महिला आणि 3 वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. हा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि उंब्रज पोलिस यांचे तातडीने मदत कार्य असून जखमींना उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *