Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची सरकारने बदली केली.
बदलीनंतरच्या काही दिवसांतच वाझे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
चर्चेचं कारण ठरलं आहे त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस !
मनसुख हिरेन प्रकरणात अजूनही वाझे यांच्या नावाची चर्चा होत असतानाच त्यांनी हे स्टेटस ठेवलं असून, त्यावरून वाझे यांच्या मनात चाललंय काय ?

वाझे यांना काय म्हणायचं ?
असे प्रश्न उपस्थित करत चर्चा रंगली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे वाझे यांनी स्टेटसमध्ये जगाचा निरोप घेण्यासंदर्भातला उल्लेख केलेला आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरील भा.ज.पा.ने विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरलं होतं.
हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल सवाल करतानाच मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
भा.ज.पा.कडून सातत्यानं मुद्दा लावून धरण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती.
अखेर वाझे यांची बदली करण्यात आली आहे.

नक्की कोण आहेत सचिन वाझे?

बदली करण्यात आल्यानंतर वाझे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय असा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे.
“तीन मार्च २००४.
सी.आय.डी.मधील काही जणांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली.
या अटकेसंदर्भात अजूनही वाद आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी शक्यता आहे.
मला पुन्हा एकदा खोट्या आरोपांखाली अडकवण्याची शक्यता आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडा बदल आहे.
आधी हे घडलं तेव्हा माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *