Big9News Network
विस्तारीकरणा संदर्भात बुधवार दि १ जून रोजी मुंबई उपमुख्यमंत्री यांच्या दालनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. अजित पवार व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. श्री. जयंतराव पाटील, माजी आमदार श्री. राजन पाटील व आमदार श्री. यशवंत माने व जलसंपदाचे कार्यकारी संचालक राजपूत व नियोजन व अर्थ विभागाचे सचिव यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.
झालेल्या बैठकीत आष्टी उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणाला तत्वता मान्यता देण्यात आली असून योजनेच्या सर्वेक्षणाचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्याच्या सूचना देखील या बैठकीत उपमुख्यमंत्री मा ना श्री अजित पवार व जलसंपदा मंत्री ना. श्री जयंतराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या योजनेत नव्याने देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाचीवाडी, अनगर व चिखली या गावांचा समावेश केलेला असून योजना कार्यान्वित झाल्यास या गावातील चार हजार 600 हेक्टर एवढे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. भविष्यात या भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे, असे ही आमदार श्री यशवंत माने यांनी सांगितले आहे.
यावेळी या बैठकीस तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, सोलापूर जिल्हा दुध संघाचे व्हा चेअरमन दीपकदादा माळी, मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अस्लम चौधरी,अनिल कादे उपस्थित होते.