Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

BIG 9 NEWS NETWORK

शेखर म्हेत्रे माढा प्रतिनिधी : सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून जि. प. सोलापूर, सोलापूर ग्रामीण पोलीस व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज माढा पोलीस स्टेशन हद्दीतील 39 गावांमधील सर्व पोलिसपाटील, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास साठी कोरोना नियमाचे पालन करुन नागरिक उपस्थिती होते.
माढा पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले, सर्व सरपंच व नागरिकांनी यंत्रणेत पुढील ४८ तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. या वेळी तहसीलदार राजेश चव्हाण,गटविकास अधिकारी संताजी पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्या मीनलताई साठे माढा नगर पंचायत चे सर्व अधिकारी , पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी, अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनात माढा पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माढा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, महम्मद शेख तसेच सर्व पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वी केला.


चौकट..
१)ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये :
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा,

२)गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत

३)संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 270 3600

४)यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.

५)संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.

६)दुर्घटनेचे स्वरूप,तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.

७)नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात

८)नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.

९)एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.

११) वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.

१२) घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते.

१४) संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
१५)चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.

१६)गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
१७)सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *