Big9 News
गरपीट वादळी वाऱ्यामुळं शेकऱ्यांच नुकसान
मिरचीच्या किमतीत होणार वाढ
अवकाळी पावसानं लाल मिरचीला लागली बुरशी
भंडारा जिल्हा
महाराष्ट्रातील धान्य उत्पादकाच्या जिल्हा म्हणून ओळखला जातो.मात्र या सगळ्या गोष्टीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी खऱ्या अर्थानं मिर्ची उत्पादनाकडे वळलेले आहेत. परंतु अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात मिरचीचे नुकसान झाले आहे. खऱ्या अर्थाने भंडारा जिल्ह्यातील लाल मिरची उत्पादक शेतकरी मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बाजारपेठामध्ये आपण जर एकंदरीत जर बघितले असेल तर आंध्र प्रदेश असेल हे मध्य प्रदेश असेल या इतर राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थाने या लाल मिरचीची मागणी आहें.मात्र वातावरणाच्या बदलामुळे कधी ऊन तर कधी खऱ्या अर्थाने अवकाळी पाऊस त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत सापडला आहें.
त्यामुळे याची बाजारपेठेमध्ये जी मागणी होती ती बाजारपेठातील मागणी सुद्धा आता घटणार आणि त्यामुळे कुठेतरी भंडारा जिल्ह्यातील जे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार अवकाळी मुळे लाल मिरची एकंदरीत आता तिखट होण्याच्या मार्गावरआहें.
एकंदरीत यंदा ज्या शेतकऱ्यांनी जे उत्पादन घेतले त्यांना असं वाटत होतं की मोठ्या प्रमाणात फायदा होईल मात्र अचानक वातावरणाच्या बदल आणि त्यामुळे होणारा नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.