MH13 News Network
सोलापूर, (प्रतिनिधी)ः- भगवान श्रीकृष्णाने पराक्रम केले परंतु पांडवांची किर्ती वाढवली म्हणूनच जगात सर्वात मोठा त्याग हा स्वतःच्या किर्तीचा त्याग आहे असे आपल्या निरूपणात हभप चारूदत्त आफळे गुरूजी यांनी केले. डॉ. राजीव दबडे आणि डॉ. माधुरी दबडे यांच्या कृष्णामाई हॉस्पिटलच्या वतीने आयोजित भागवत पुराण कथा सप्ताहाच्या सातव्या दिवशी ते बोलत होते.
आर्ताच्या रक्षणासाठी भगवंताने आपल्या किर्तीचा त्याग केला. व्यास मुनींनी आपल्या सिध्दहस्ते लिहलेल्या भागवत पुराण कथा शुकाचार्याने परिक्षिताला सांगितल्या त्याचे आपल्या अमोघवाणीतून भागवताचार्य हरिभक्त परायण चारूदत्त आफळे गुरूजी यांनी सादर केले. भगवंत स्वास्थ आणि स्फुर्ती देतो, भक्तीयुक्त भावनेने भागवत ग्रंथाकडे पहा, भगवान श्रीकृष्णाने केलेल्या सोळा सहस्त्र बायका कशा केल्या. त्याचबरोबर महाभारतामध्ये श्रीकृष्णाने घेतलेली भुमिका आणि पांडवांचा विजय याबाबत भागवत ग्रंथामध्ये जे नमूद केले आहे त्याचे सविस्तर उदाहरणासह घटनांची मांडणी हभप आफळे गुरूजी यांनी केली.
प्रारंभी डॉ. माधुरी दबडे यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी भागवत पुराण कथा सप्ताहाच्या आयोजनाची पार्श्वभुमी सांगितली तसेच गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या भागवत सप्ताहाला सहकार्य करणार्या सर्वजणांचे त्यांनी आभार व्यक्त केले. सुरूवातीला आरोही सहस्त्रबुध्दे हिने सुमधूर आवाजातून भक्तीगीत सादर केले त्यानंतर आफळे गुरूजी यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला नंतर भागवत पुराण कथेला प्रारंभ करण्यात आला. तब्बल 3 तास हा निरूपणाच्या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी मोठी गर्दी केलेली होती तसेच युवक युवतीही मोठ्यासंख्येने भागवत सप्ताहाला हजेरी लावलेली होती. निरूपणानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
आज सप्ताहाचा समारोप
दि. 23 मार्च पासून दररोज सायंकाळी 5 ते 8 या वेळेत किर्लोस्कर सभागृहात सुरू असलेल्या हभप चारूदत्त आफळे गुरूजी यांच्या रसाळ वाणीतील भागवत सप्ताहाचा समारोप बुधवार दि. 29 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे.
…………………………………………………………….