राज्यात १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.६: राज्यासाठी मोठी दिलासादायक बाब म्हणजे आज देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले ११,५१४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३१६ मृत्यू …
(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९१० (५७), ठाणे- २०९ (११), ठाणे मनपा-२६६ (२७),नवी मुंबई मनपा-३८४ (२), कल्याण डोंबिवली मनपा-२४३ (७),उल्हासनगर मनपा-२४ (३), भिवंडी निजामपूर मनपा-२९ (६) , मीरा भाईंदर मनपा-१५७,पालघर-७६ (४), वसई-विरार मनपा-१८६ (६), रायगड-२५९ (४), पनवेल मनपा-१७० (१), नाशिक-१८७(२),नाशिक मनपा-६०२ (११), मालेगाव मनपा-२६, अहमदनगर-२४९ (५),अहमदनगर मनपा-२८४, धुळे-५७ (१), धुळे मनपा-१२९ (१), जळगाव-३४३ (१३), जळगाव मनपा-१३७, नंदूरबार-४९ (१), पुणे- ५९४ (१२), पुणे मनपा-१५१२ (३१), पिंपरी चिंचवड मनपा-९८५ (१९), सोलापूर-२०५ (१४), सोलापूर मनपा-६७ (१), सातारा-२०५ (२), कोल्हापूर-४२१ (११), कोल्हापूर मनपा-१४३ (२), सांगली-७५ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५४ (२), सिंधुदूर्ग-५, रत्नागिरी-५७ (१), औरंगाबाद-१८५ (२), औरंगाबाद मनपा-८६ (५), जालना-६६, हिंगोली-१४, परभणी-१४ (४), परभणी मनपा-१८ (३), लातूर-१३२ (२), लातूर मनपा-८० (४), उस्मानाबाद-१२६, बीड-१०९ , नांदेड-६६ (३), नांदेड मनपा-४९ (२),अकोला-४१ (१), अकोला मनपा-३३, अमरावती-६८ (२), अमरावती मनपा-७३ (५), यवतमाळ-४४ (२), बुलढाणा-८२ (३), वाशिम-२३, नागपूर-२०६ (६), नागपूर मनपा-३३१ (१२), वर्धा-५, भंडारा- ५३, गोंदिया-२३, चंद्रपूर-५२, चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१३, इतर राज्य १५.