Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिरं, धार्मिक स्थळं खुली होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महराष्ट्रात बंद करण्यात आलेली मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य नियमांचं काटेकोर पालन केलं जावं, अकारण गर्दी करू नये हे आवाहन करण्यात आलं आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *